गुरुवार, 6 अप्रैल 2023

भारत सरकारने काढलेली बाल संगोपन योजना 2022-2023

 *" शासनाची बाल संगोपन योजना "*

*दरमहा 2250 /- रु*  


     ज्या मुलांना *आई किंवा वडील* नसतील व  ज्या मुलांना *आई व वडील दोन्ही ही नसतील* अशा 

*बालकांना* या  योजनेचा  लाभ मिळतो . 

*० ते १८ वयोगटातील*

*बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो. एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांना ही लाभ दिला जातो.* 


*किती रक्कम मिळते ?* 

एका मुलांसाठी *2250 रु  प्रतिमहिना*( एका वर्षाला *27000/- रु मिळतात .) वय १८ पुर्ण होई पर्यत दर महिन्याला  रक्कम मिळते*.


*कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत...?* 

 १) योजने साठी करावयाचा अर्ज व अर्जा सोबत         👇👇   

२) आधार कार्ड च्या झेराँक्स पालकांचे व बालकांचे

३) मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टफिकेट

४) तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला.

५) पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र .(मृत्युचा दाखला)

६) पालकाचा रहिवासी दाखला. 

(ग्रामपंचायत /नगरपालिका यांचा)

७) मुलांचे बॅक पासबुक झेराँक्स.

८) मृत्यूचा अहवाल - ( कोविड ने जर मृत्यु झाला असेल तर मृत्युचा अहवाल)

९) रेशन कार्ड झेराँक्स .

१०) घरा समोर पालका सोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड  मापाचा फोटो ( प्रत्येक मुलासोबत पालकाचा शेफरेट फोटो )

१०) मुलांचे पासपोर्ट फोटो 2

११) पालकाचे पासपोर्ट फोटो 

सदर सर्व कागद पत्रांची पुर्तता करुन अर्ज करता येतो .


*ही योजना मंजूर कोण करते ?* 


*हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बाल कल्याण समितीकडे सादर केला जातो व ती समिती अर्ज मंजुर करते.*


*जिल्हा परिषद शाळेत व  महाविदयालय शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला बोनाफाईट आत्ताच शाळेतून काढून ठेवावा ..*


*या योजनेचा लाभ घ्या व १८ वर्षापर्यंत बालकांच्या शिक्षणाच्या खर्चा साठी  चिंता मुक्त व्हा.*

 

================


*सदर योजना अनेक वर्षा पासुन चालु आहे .पण अनेक पालकांना   ही योजना माहीत नाही.*

म्हणुन     🙏👏                *आपण हा मेसेज इतर नंबर व ग्रुप वर , तसेच आपल्या गरजु  नातेवाईकांना सामाजिक भुमिकेतुन हा मेसेज पाठवावा*.


 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


व *अनेक निराधार ,गरजु बालकांना या योजनेचा लाभ घेता येईल*

===========

 

*बाल संगोपन योजनेची माहीती* *साठी  ,फार्म जमा करण्याठी 👇

                                                             *तालुका पंचायत समिती ऑफिस मध्ये* 

*बाल संरक्षण अधिकारी यांना भेटावे.*


            *किंवा*




*जिल्ह्य च्या ठिकाणी*


*जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय या  ठिकाणी भेटावे .*

अश्याच योजनांच्या माहितीसाठी subscribe करा youtube channel - IcoNikAkki

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🤝🙏🙏🙏🙏🙏

कोणताच धंदा छोटा नसतो हे दाखवून देणारे शेतकरी उद्योजक

 दहा शेतकऱ्यांनी प्रत्येकी अर्धा एकर ऊसाची लागवड केली आहे. त्यातून ते ऊसापासूनचे उपपदार्थ बनवत आहेत. ऊसाचा रस फ्रोजन करुन ठेवला जातो. जर ऊस कारखान्याला दिला असता तर टनाला 2 ते 3 हजार रुपये मिळाले असते परंतु त्यांना कुल्फी बनवल्या नंतर त्यांना 15 हजार रुपये प्रति टन दर मिळतो आहे. 


सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या ऊसापासून बनवलेली कुल्फी ही ग्राहकांच्या पसंतीस उतरते आहे. दररोज 1000 ते 1200 कुल्फी विकल्या जातात. अष्टविनायक रस्त्यालगत आऊटलेट असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग आहे. ऊसाची कुल्फी पहिल्यांदा पाहिल्याने लोक इथे थांबत आहेत. ऊसापासूनची कुल्फी ही आरोग्यदायी असल्याचे सांगत आहेत. थंड कुल्फी खाल्ल्याने आरोग्यास कोणताही धोका नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच कुल्फीची किंमत देखील फक्त 10 रुपये आहे. यासाठी लागणारी मशनिरी ही मुंबई आयआयटीमधून आणण्यात आली आहे. ऊस बाहेर ठेवला तर अर्ध्या तासात काळा पडतो परंतु ही कुल्फी 6 महिने टिकते. ग्रुपमधील शेतकऱ्यांना रोजचे हजार रुपये मिळत आहेत. अनेकदा ऊस कारखान्याला जात नाही म्हणून शेतकरी ऊस पेटवून कारखान्याला घालवतात. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होतं. शेतकऱ्यांनी दौंड तालुक्यातील आलेगाव येथील शेतकऱ्यांचा आदर्श घेतला तर अनेक शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल यात शंका नाही.


पर्याय खूप आहेत, फक्त धंद्यात उतरणे गरजेचे आहे.

उद्योजक आयडिया पैशाचे ज्ञान यासाठी subscribe youtube channel - IcoNikAkki

शनिवार, 18 मार्च 2023

Buddhi cha sadupyog kaise kare ek katha

 बुद्धीचा सदुपयोग करने का गरजेचे आहे।

मी एका कार्यक्रमात बोलताना समोर बसलेल्या बांधवांना विचारल, सर्वात हुशार प्राणी कोणता ? कुणीच बोलेना, नुसतेच एकमेकांकडे बघत राहीले. मग मी म्हंटल, तुम्हाला खात्री नाही का , माणूस हाच सर्वात हुशार प्राणी आहे ! इतक्यात एक चिमुकली उठली, म्हणाली नाही बाबा, माणूस नाही. मांजर सर्वात हुशार प्राणी आहे. मी विचारल कस काय ? तर म्हणाली मांजरी समोर प्लास्टीक, माती किंवा दगडाचा उंदीर ठेवला तर ती त्याच्याकडे ढुंकून पण बघत नाही. आणि माणूस बघा, स्वतःच देव बनवतो आणि स्वतःच हात जोडून त्या खोट्या देवाच्या समोर हात जोडून सुख, समृध्दी,संकट दूर करण्याची आणि लेकराबाळाची भीक मागतो.मी त्या मुलीला जवळ बोलवल आणि  तीला विचारल , बाळा तुला हे कुणी सांगितल ? 

YouTube link-  IcoNikAkki

तर ती म्हणाली, व्हाॕट्सअॕपवर वाचल तेंव्हा कळल, पण बाळा व्हाॕट्सअॕपवर तर सगळेच अशा पोस्ट वाचतात. तुलाच हे का पटल ? तर म्हणाली मी हे करून पाहिल.आणि मी गाडगेबाबांचीही एक पोस्ट वाचली होती बाबा. जो देवळातला देव देवळात अंधार झाल्यावर लाईट लाऊ शकत नाही, जो देवळातला देव नैव्येद्यावर बसलेला कावळा किंवा कुत्र हाकलू शकत नाही, तो भक्तांच काय भल करणार ! बाबा हेच खर आहे. माणसा पेक्षा प्राणीच हुशार आहेत. आणि सर्वात मूर्ख माणूस आहे.



क्षणभर मला वाटल या मुलीचे पाय धरावे. कारण जे तीला या वयात कळल ते आमच्या शिक्षित उच्च शिक्षित बुळ्या बावळ्यांना नाही कलत.

याला म्हणतात मोबाईलचा सदुपयोग.

सत्यघटनेवर आधारित लेख।

शनिवार, 18 फ़रवरी 2023

Adani and Hindenburg reports affairs

(Adani and Hindenburge Affairs)


अडानी वरील हिंडेनबर्ग रिपोर्ट अदानी समूहाच्या शस्त्र उत्पादनाशी संबंधित आहे का? राजकीय कारणापेक्षा अमेरिकन अर्थव्यवस्थेतील शस्त्र व्यापाराच्या आर्थिक महत्वाचं कारण जास्त मोठं आहे का? याचा पडताळा...

Click here for video- YouTube video


गेले काही दिवस  अदानी उद्योगसमूहावरील हिंडेनबर्ग रिपोर्टने भारतीय राजकारण, अर्थकारण आणि शेयर बाजार ढवळून निघालेला आहे. एका लहानशा संस्थेने (?) भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या  अदानी समूहावर केलेल्या आरोपांनंतर समूहाच्या सर्व प्रमुख कंपन्यांचे शेयर मूल्य निम्म्याच्या खाली आले, लाखो गुंतवणूकदारांचा शेयर पोर्टफोलिओ डळमळला आणि राजकीय पक्षांना अचानक नवा मुद्दा मिळाला. यामागे  अदानीला धक्का देऊन केंद्र सरकारला अडचणीत आणणं हा सकृतदर्शनी मुख्य अजेंडा वाटत असला तरी यामागे खरं कारण समूहाची शस्त्र उद्योगात वाढणारी गुंतवणूक आहे हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. 


शस्त्रजीवी अमेरिकन समाज आणि अमेरिकन शस्त्रास्त्र उद्योग!


प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी याने पश्तुन लोकांना (सध्या आपण ज्यांना पठाण/ पख्तुन म्हणतो ते) "शस्त्रजीवी समाज" म्हटलं होतं कारण प्रत्येक पश्तुन सतत आपल्या सोबत एक हत्यार बाळगतो. आजही पाकिस्तानी खायबर पख्तुनख्वा प्रांतात किंवा अफगाणिस्तानात राहणारे पश्तुन सोबत एक खंजीर, तलवार किंवा रायफल घेतल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. त्यांची शत्रावर मोठी भक्ती आहे. अमेरिकन समाज असाच एक शस्त्रजीवी समाज आहे. त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्यासाठी परवाना लागत नाही आणि ते विकणारी दुकाने राजरोसपणे चालवली जातात. "कॅसल डॉक्टरीन" मुळे आपल्या हद्दीत आलेल्या कोणत्याही व्यक्तीला गोळी मारणे तिथे वैध आहे. त्याशिवाय अमेरिकन अर्थव्यवस्थेत शस्त्रविक्रीचा वाटा थक्क करणारा आहे.


अमेरिकन शस्त्रविक्रीचा आर्थिक आकार...


जागतिक शस्त्रविक्रीमध्ये अमेरिकन वाटा ३७% असून अमेरिकन घरगुती वार्षिक उत्पन्नात (जीडीपी) शस्त्रविक्रीतून आलेल्या उत्पन्नाचा वाटा ३.३%  म्हणजे ७४२ अब्ज अमेरिकन डॉलर्स  किंवा ६१ लाख ४० हजार ७९२ कोटी भारतीय रुपये (६१,४०,७९२ कोटी रुपये!) इतका प्रचंड आहे. या व्यापाराला भारतासारख्या देशातून हळूहळू स्पर्धा वाढत आहे आणि त्यासाठी अशी स्पर्धा करणाऱ्या भारतीय उद्योगांना वेळीच जेरीस आणणं हि अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी काळाची गरज आहे!


अदानीचा समूहाचा शस्त्रउद्योगात वावर...


अदानी समूहाच्या अदानी डिफेन्स सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड, ऑर्डफेन्स सिस्टिम्स लिमिटेड, अदानी एरोस्पेस अँड डिफेन्स, अदानी नेव्हल डिफेन्स सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजीज, अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीज, पीएलआर सिस्टम्स आणि अदानी एलबीट ऍडव्हान्स सिस्टम्स. यापैकी पीएलआर सिस्टम्स  अदानीने ताब्यात घेतल्यावर ती इस्राईली वेपन इंडस्ट्रीज( IWI) सोबत आपोआप जॉईंट व्हेंचर झाली. 


अदानी समूह सध्या एयर डिफेन्स सिस्टम्स सह मानवरहित टेहळणी, सर्व्हिलन्स आणि इंटेलिजन्स गॅदरिंग करणारी विमाने अर्थात UAV उत्पादन करतो. याशिवाय सैन्यासाठी सर्वात जास्त लागणारी छोटी शस्त्रे आणि उपकरणे, अचूक मारा करणारी शस्त्रे (Precision Guided Munitions), इलेकट्रॉनिक वॉरफेयर सिस्टम्स, सिम्युलेटर्स आणि सेन्सर्स या क्षेत्रात अदानी मोठा उत्पादक म्हणून समोर येत आहे. 


सैन्यासाठी हवाई सुरक्षा देणारी एयर डिफेन्स रडार्स पुरवण्याबाबतचा करार सुद्धा झालेला असून त्याचा प्रत्यक्ष पुरवठा २०२४ ला होईल. पूर्वी इस्राईल कडून आयात होत असलेल्या टावोर असौल्ट रायफल, नेगेव्ह लाईट मशीन गन्स, गाली स्नायपर रायफल्स या आता जॉईंट व्हेंचर मधून अदानी समूह भारतात तयार करतो.


वायुसेनेसाठी लागणारे ग्लाईड बॉम्ब, पायदळाच्या चिलखती गाड्यात बसवलेले अत्याधुनिक रेडिओ सेट्स, विमानांसाठी लागणारी फायर कंट्रोल रडार्स, लढाऊ विमाने चालवण्याचे प्रशिक्षण देणारी सिम्युलेटर मोड्यूल्स, इस्रायली कंपनीसोबत लांब पल्ल्याची हर्मिस मानवरहित विमाने, ड्रोन विरोधी रडार उपकरणे आणि ड्रोन विरोधी रुद्रव सिस्टम हि सैन्य उपकरणे सध्या अदानी समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्या भारतात तयार करते. आगामी काळात लढाऊ विमाने तयार करणाऱ्या स्वीडिश विमान कंपनीसोबत ग्रीपेन फायटर जेट्स भारतात तयार करण्यासाठी करार करण्याची अदानी ची योजना आहे.


भारतीय शस्त्र उद्योगाचा वाढता विस्तार आणि अमेरिकन चिंता....


भारत सरकारच्या मेक इन इंडिया योजनेमुळे डीआरडीओ, इसरो या सरकारी कंपन्यांनी आणि टाटा, एल अँड टी , अदानी यांच्यासारख्या खाजजी उद्योगांनी सध्या लहान शस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि काही अत्याधुनिक उपकरणे लहान लहान देशांच्या सैन्याला अमेरिकन आणि युरोपियन किंमतीच्या पेक्षा कितीतरी स्वस्त दरात विक्रीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे भारताची शस्त्र आयात भविष्यात वेगाने घटेल आणि आणि एक मोठा शात्र निर्यातदार देश म्हणून भारत पुढे येईल. याला खोडा घालण्यासाठी अमेरिकन "वेपन्स लॉबी" कंबर कसून मैदानात उतरली आहे.


अमेरिकन फार्मा आणि वेपन्स लॉबी...


फायझर ची कोविड लस नं घेता भारताने स्वतःची लस तयार करून जगभर वितरित केली आणि देशांतर्गत १३० कोटींचं मार्केटही अमेरिकन लशीपासून मुक्त ठेवलं, भारतीय बनावटीच्या तेजस फायटर जेटचा भारतीय वायुसेनेसोबत १८३ विमाने खरेदी करायचा करार झाला आणि याचा बदला म्हणून फार्मा आणि वेपन्स लॉबीने भारतात नद्यांवर तरंगणारी प्रेते, कृषी कायदे याविरोधात आंतरराष्ट्रीय खेळाडू मैदानात उतरवले. अमेरिकन गायिका रिहानाला कृषी कायद्यांच्या विरोधात ट्विट करण्यासाठी कोट्यवधी रुपये बिदागी देण्यात आली, तरीही भारतीय सरकार दबत नाही त्यामुळे आता भारतीय उद्योगांना ठोकण्याची नवी खेळी सुरु झाली आहे.



घाना कफ सिरप आणि अदानी समूह...


भारतीय कफ सिरप पिऊन घाना देशात ६५ बालके दगावली याचा अर्थ भारतीय औषधे स्टॅंडर्ड नाहीत असा प्रचार जगभर करून झाला पण अपवाद वगळता भारतीय औषधे दर्जा आणि किंमत याबाबतीत जगभर लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे आता शस्त्रनिर्मितीत आघाडी घेऊ पाहणाऱ्या भारतीय उद्योगांना ठोकण्याची मोहीम सुरु झाली आहे.



राजकीय सोय म्हणून अदानी अंबानीला ठोकत राहू पण खाजगी उद्योगांना पर्याय नाही आणि नवीन पिढी ८०-९० च्या दशकात जशी शाळा मास्तर, बँक, पोस्ट यात नोकरी करून संसार चालवत होती तशी नवीन पिढी जगू शकत नाही कारण शाळा मास्तर, बँक, पोस्ट यात रोजगाराला मर्यादा आहेत, खाजगी उद्योगांना नियमात बांधून ठेऊन ते जनहिताच्या विरोधात जाणार नाही याची काळजी नक्कीच घेतली जावी परंतु संपत्ती आणि रोजगार निर्माण करणारे उद्योगपती गुन्हेगार नाहीत हि खूणगाठ आपण मनाशी बांधली पाहिजे...

शुक्रवार, 6 जनवरी 2023

ICC T20 India vs Bangladesh thrilling final #cricket,#IcoNikAkki,#IcoNik...



ICC T20 final match ever 2016
Best final ever 
Link-youtube


आयसीसी टि20 का रोमांचक फायनल मुकाबला जिसे देखकर सबके रोंगटे खडे हो जाते है।
भारत बनाम बांग्लादेश का जबरदस्त मुकाबला जो अंतिम गेंद तक चला और बांग्लादेश को आखरी ओवर मे भारत ने कैसी मात दी।
आंखो से न जानेवाला फायनल का द्रश्य।

शुक्रवार, 30 दिसंबर 2022

१ जानेवारी शहीद दिवस विशेष लेख शहीद दिवस

१ जानेवारी शहीद दिवस विशेष



         १ जानेवारी १८१८ चा  दिवस.

*जगाच्या इतिहासातील एका अतुल्य पराक्रम आणि शौर्याचा दिवस.*


याच दिवशी जुलमी व अन्यायी पेशवाईचा अंत झाला होता.

हि लढाई पुण्याजवळील भिमाकोरेगांव येथे ब्रिटीश आणि दुसरा बाजीराव पेशवा यांच्यात झाली होती.या लढाईत ब्रिटीशांच्या बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फ़्रटीच्या सेकंड महार बटालियनच्या केवळ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या २८००० सैन्याचा पराभव केला. आणि देशातील जुलमी मनुवादी व्यवस्थेचा अंत केला. महार सैनिक पेशव्यांच्या विरुद्ध लढण्याची काही कारणे होती. मनुस्मृतीनुसार महार व इतर अस्पृश्य समाजाला गुलाम बनवले गेले होते. त्यांच्यावर अन्यान्वित अत्याचार केले गेले. त्यांना जनावरांपेक्षाही हीन वागणूक दिली जात होती. मनुस्मृतीच्या कायद्यानुसार त्यांना कठोर व अमानवीय शिक्षा दिल्या जात होत्या. लहान मुले,स्त्रिया यांचे देखील शोषण केले जात होते. हा अत्याचार हजारो वर्षांपासून अस्पृश्य समाज भोगत आला होता. छत्रपती शिवरायांच्या काळात मात्र अस्पृश्यांना या अत्याचारातून मुक्ती मिळाली होती. शिवाजी महाराजांमुळे अस्पृश्यांचे गुलामीचे जीवन नष्ट होऊन त्यांना मानाचे स्थान मिळाले होते. भीमा कोरेगावच्या लढाईपूर्वी महार सैनिक हे पेशव्यांचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी मुघल व ब्रिटीश सैन्याविरुध्द इमानदारीने व प्राणपणाने लढले होते. त्यांनी पेशव्यांना अनेक विजय मिळवून दिले. परंतु या महार सैनिकांना सत्ताधिका-यांच्या (ब्राम्हण सैनिक) अवहेलना व अपमानाशिवाय काही मिळत नव्हते. खर्ड्याच्या लढाईत शिदनाक महाराने पराक्रम करून माधवराव पेशव्यास विजय मिळवून दिला होता. परंतु लढाईच्या मैदानातच शिदनाकसह महार सैनिकांचा ब्राम्हणाकडून अपमान करण्यात आला होता.पेशव्यांनी अस्पृश्य जातीतील मांग व चांभार यांना आपले लक्ष केले नव्हते. केवळ महारांना ते पाण्यात पहात असत. एकंदरीत महारांची पेशव्यांना भीती वाटत होती. रणांगनावर महार लोक करीत असलेले पराक्रम व त्यांना मिळत असलेले नेत्रदीपक यश बघून पेशवे राज्यकर्त्यांच्या मनात धडकी व दशहत बसली होती. महारांच्या या वाढत्या पराक्रमाला योग्यवेळी पायबंद घातला नाही तर महार हे शत्रूस मिळून पेशवेशाही बुडवतील किंवा स्वत:च राज्यकर्ते बनतील अशी शंका व धास्ती नेहमी पेशव्यांच्या मनात असे. महार लोक हे जरब महात्वाकांक्षी दिसतात हे पेशव्यांना कळून चुकले होते. त्यामुळेच सत्ता व धर्माच्या माध्यमातून महारांना बंधनात अडकविण्याचे षडयंत्र रचण्यात आले.अस्पृश्य समाजातील

विशेषत: महारांचे सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क हिरावून घेण्यासाठी मांग,चांभार व महार यांची अतीशुद्र व अस्पृश्य म्हणून गणना करण्यात आली व त्यांना गावकुसाबाहेरच्या वस्तीत राहण्यास बाध्य करण्यात आले. या अतिशुद्रांनी आचरण कशा पध्दतीने करावेत व त्यांची कर्तव्ये काय असावीत याची संहिता तयार करण्यात आली.मनुस्मृतीमध्ये या संहितेला कायद्याचे स्वरूप देण्यात आले. मनुस्मृतीच्या कायद्याचे पालन न करणाऱ्यास कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली.पेशवे स्वत:च कोकणस्थ ब्राम्हण असल्यामुळे मनुस्मृती तंतोतंत लागू करण्याचा आपला जन्मसिध्द हक्कच आहे या अविर्भावात वागत असत.अस्पृश्यांना बाजारात फिरण्याची मोकळीक नव्हती. अस्पृश्यांना ठरवून दिलेल्या वेळेशिवाय सार्वजनिक रस्ते सुध्दा वापरता येत नव्हते. अस्पृश्य वर्गाला स्पर्श करणे हे पाप असून त्यांची सावली सुद्धा अंगावर पडू दिली जात नसे. त्याकरिता अस्पृश्यांना गावात सकाळी नऊ वाजन्याच्या अगोदर व दुपारी तीन नंतर फिरण्याची सक्त मनाई असे कारण त्या कालावधीत सूर्य प्रकाशामुळे माणसांची सावली लांब पडत असते व अस्पृश्य माणसाची सावली इतर स्पृश्य लोकांवर पडू नये म्हणून हा नियम बनवण्यात आला होता. अस्पृश्यांना देवळात,पाणवठे व शिक्षणास मज्जाव करण्यात आला. पेशवाईच्या काळात अस्पृश्य समाजाच्या गळ्यात थुंकण्यासाठी मडके व पायाखालील रस्ता साफ करण्यासाठी कमरेला झाडू लावण्याची सक्ती करण्यात आली होती. कारण त्यांच्या थुंकीवर पायपडला तर विटाळ मानला जाई. तसेच पायाचे ठसे जमिनीवर उमटल्यानंतर त्या ठश्यांवर कोणत्याही स्पृश्य माणसाचा पाय पडू नये म्हणून ते ठशे झाडून जाण्यासाठी कंबरेला झाडू बांधला जाई.अस्पृश्यांनी तीर्थास जाऊन मंदिर प्रवेश केल्यास त्याचे परिपत्य करावे असे पेशवा सरकारचे सक्त आदेश होते. ब्राम्हण रस्त्यात भेटला तर अस्पृश्यांनी लगलेच खाली बसावे व पालथे पडावे असा दंडक होता. दुस-या बाजीरावाच्या काळात एखादा महार वा मांग तालीमाखान्यापुढून गेल्यास गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू व तलवारीचा दांडू करून खेळल्या जात असे असा महाभयानक अत्याचार अस्पृशावर होत असे. त्यांना शहरात वास्तव्य करण्याची मुभा नव्हती. अस्पृश्यांना वेशीबाहेर दूर अंतरावर गलिच्छ व दरिद्री राहून झोपड्या बांधून राहण्यास भाग पाडल्या जात होते. खेड्यातील विहिरीजवळून महार जात असताना त्याला गुडघ्यावर रांगत जावे लागत असे, कारण त्याची सावली पाण्यावर पडली म्हणजे विटाळ मानला जात असे.ब्राम्हणाने अस्पृश्य स्त्रिशी व्यभिचार केला तर तो त्यांना चालत असे. तेव्हा विटाळ बिटाळ याची ते परवा करीत नसत. ब्राम्हणांची अशी प्रकरणे बाहेर आल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नसे तर केवळ प्रायश्चित घेत असत. त्यामुळे गुन्हे करणे व प्रायश्चित घेऊन परत गुन्हा करणे हा ब्राम्हणांचा धंदाच झाला होता.दुसरा बाजीराव पेशवाने कित्येक स्त्रियांवर बलात्कार केले. तो कोणत्याही स्त्रीला जबरदस्तीने उचलून आणून शनिवारवाड्यात अत्याचार करत असे. पेशव्यांच्या या अत्याचारवरूनच तर समाजात ‘पाशवी अत्याचार,पाशवी बलात्कार'हे शब्द रूढ झाले आहेत. दुसरा बाजीरावची स्त्रियांमध्ये इतकी दहशत पसरली होती कि कित्येक स्त्रियांनी विष पिऊन आत्महत्या केल्या.महार-मांगावर कोणीही अत्याचार करावा व त्यांनी तो निपुटपणे सहन करावा अशी प्रथाच रूढ झाली होती. त्यामुळे महार-मांगाना बळी देण्याची क्रूर प्रथा सुरु झाली. इमारतीच्या पायात,किल्ला,किल्ल्याचा बुरुज,पूल,तळे व बांधकामात अस्पृश्यांचा बळी दिल्या जात असे. अशा अस्पृश्यतेच्या नावाखाली पेशव्यांनी अस्पृश्यांना दिलेली वागणूक अन्यायकारक व क्लेशदायक होती.हा अन्याय व अपमान सहन करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.या अस्पृश्य समाजाने ब्रिटीशांच्या सैन्यात भरती होण्यास सुरुवात केली कारण ब्रिटीश अधिकारी अस्पृश्य म्हणून कधीच कोणाचा भेदभाव करत नव्हते. उलट ते इथल्या जातीवादी व मनुवादी व्यवस्थेचा तिरस्कार करत होते आणि म्हणूनच अस्पृश्य समाजातील लोक ब्रिटीश सैन्यात भरती झाले. ब्रिटीश अधिकारी पेशव्यांविरुद्ध लढाई करण्यास योजना तयार करू लागले तेंव्हा ब्रिटीशांच्या महार बटालियनचा सेनापती 'शिदनाक महार' हा दुसरा बाजीराव पेशव्यास भेटण्यास गेला आणि त्याने बाजीरावास सांगितले कि, "ब्रिटीश हे परके आहेत, आम्ही त्यांच्या बाजूने न लढता आपल्या बाजूने लढू. आम्ही मायभूमीसाठी प्राणदेखील अर्पण करू,फक्त आम्हाला आपल्या राज्यात सन्मानाने आणि समानतेने जगण्याचा अधिकार द्या." परंतु पेशव्यांनी त्याची हि मागणी अमान्य केली आणि सांगितले कि, "तुम्हाअस्पृश्यांना आमच्या राज्यात सुईच्या टोकाएवढादेखील सन्मान भेटणार नाही." अशाप्रकारे खूप अपमानजनक शब्द वापरून पेशव्यांनी शिदनाक महारास हाकलून दिले. त्यामुळे शिदनाक महार याने ठरवले कि,या देशातून जुलमी पेशवाई राजवट कायमची नष्ट झाल्याशिवाय अस्पृश्य समाजाला न्याय भेटणार नाही. आणि

अखेर १ जानेवारी १८१८ रोजी तो दिवस आला आणि पेशवाईने केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्याची संधी महार बटालियनला मिळाली.शिरूर छावणीपासून ब्रिटीशांच्या बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फ़्रट्रिच्या महार बटालियनचे ५०० सैनिक पुण्याच्या दिशेने पुणे काबीज करण्यासाठी निघाले. ब्रिटीशांकडून कॅप्टन *Fransis Stauntons* हा बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फ़्रट्रिच्या महार बटालियनचे नेतृत्व करत होता आणि शिदनाक महार हा या बटालियनचा सेनापती होता. ब्रिटीश पुण्याकडे निघाले आहेत हि बातमी दुसरा बाजीराव पेशवाला समजताच त्याने बापू गोखले यांच्या नेतृत्वाखाली २८००० सैन्याचा फौजफाटा शिरूरच्या दिशेने पाठवला. महार बटालियनचे सैन्य अन्न पाण्याविना, कडाक्याची थंडीत २७ मैलांच्या अथक पायी प्रवासानंतर कोरेगाव भीमा येथे पोहचले.दोन्ही सैन्याची सकाळी १० वाजता भीमा कोरेगाव येथे आमने-सामने गाठ पडली. पेशव्यांच्या २८००० सैन्यापुढे ब्रिटीश महार बटालियनचे ५०० सैनिक तुटपुंजे होते. युद्धाला तोंड फुटले आणि पेशव्यांच्या सैन्याने ब्रिटीश सैन्याला घेराव घातला. ब्रिटीशांचा एक महार सैनिक पेशव्यांच्या ५६ सैनिकांसोबत लढत होता. आपली तहान भूक विसरून हे महार बटालियनचे सैन्य शत्रूला तोंड देऊ लागले. महार बटालियनचा प्रत्येक सैनिक हा सुडाच्या भावनेने पेटून उठला होता. त्यांना समोर फक्त आपल्यावर अत्याचार करत आलेला मनुवादी शत्रू दिसत होता, आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत अत्याचाराचा बदला घेण्याचा दृढनिश्चय त्यांनी केला होता. त्यांचे रक्त सळसळू लागले,त्यांनी त्वेषाने तलवारीच्या मुठी आवळल्या आणि शत्रूच्या देहाचे तुकडे पडायला सुरुवात झाली. रक्ताचे पाट वाहू लागले. त्यांचे शस्त्र जातीयवादी सैतानावर तुटून पडत होते. चातुर्वर्ण्य आणि मनुस्मृतीच्या विषमतावादी शत्रूचा खात्मा चालू होता. पेशव्यांच्या अफाट सैनिकांची संख्या क्षणाक्षणाला कमी होऊ लागली. पेशव्यांचे सैन्य खचू लागले. यातच बापू गोखले यांचा मुलगा देखील मारला गेला. बापू गोखले आपल्या मुलाचे शीर मांडीवर घेऊन ढसाढसा रडू लागला. हे पाहून पेशव्यांच्या सैनिकांची दाणादाण उडाली. पेशव्याचे सैन्य मागे हटू लागले व वाट मिळेल तिकडे पळू लागले.

YouTube channel link-click here

१ जानेवारी १८१८ रोजी रात्री हे युद्ध संपले आणि महार बटालियनने ब्रिटीशांना अविश्वसनीय असा अभूतपूर्व ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पेशव्यांची जुलमी व अत्याचारी राजवट या देशातून कायमची नष्ट झाली. मनुस्मृतीच्या विषमतावादी व्यवस्थेचा अंत झाला आणि अस्पृश्य समाजाची हजारो वर्षापासुनच्या गुलामीतून मुक्तता झाली.या लढाईत २२ शूर महार सैनिक शहीद झाले. ब्रिटीशांनी या शूर वीरांना अभिवादन करण्यासाठी आणि नव्या पिढीला या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा मिळावी म्हणून २६ मार्च १८२१ साली भीमा कोरेगाव येथे भीमा नदी किनारी विजय स्तंभ उभारला. या विजय स्तंभावर शहीद झालेल्या २२ सैनिकांची नावे कोरलेली आहेत. अशाप्रकारे जुलमी पेशवाईचा अंत करणाऱ्या या शूरवीरांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर १ जानेवारीस नेहमी या विजय स्तंभास भेट देऊन अभिवादन करत असत. आणि तेंव्हापासून दरवर्षी देशातून लाखो अनुयायी या शूरवीरांना वंदन करण्यासाठी येत असतात.

पेशवाईचा अंत करणाऱ्या शूरवीरांना विनम्र अभिवादन..!

शनिवार, 5 नवंबर 2022

Zero se hero तक के सफलता की कहाणी


 शुरुवात का जीवन

कहाणी एक ऐसे लडके की जो बचपन से ही बडा बनने का सपना देखता था। जिसे पुरा करना ही उसका मकसद बन गया था और उसे बस बडा बनना था।जिस उम्र मे बच्चे खेलकुद करते है,उस उम्र मे अपनी कहाणी का हिरो 'zero se hero' बनने के सपने देखता था।उस टाईम वहा सपने देखना बहुत ही बडी बात थी,क्योंकी एक तो छोटे गाव का लडका उपर से middle-class family। कुछ समय ऐसे ही गरीबी मे बित गया।उसके बाद उनके पिता को Cancer हो गया तब इनकी उम्र महज 8 साल की थी।फिर भी इनका सपना जारी रहा क्योकी ये बस से धक्के खा खाकर जाते थे और कोई कार अगर खुली जा रही होती तो ये माता पिता से सवाल पुछते थे की ऐसा क्यो...

तो जवाब आता था वो बडे लोग है तब से इन्होने ठान लिया बस बडा बनना है।तो Cancer की हालात मे माता पिता अक्सर अस्पताल मे ही रहा करते थे और महिने मे एक या दो बार घर आते थे।इनको एक छोटा भाई था।उसी वक्त इनके पिता का देहांत हो गया और इनकी मा घर संभाल रही थी।उस वक्त collage decide करता था किसे कौनसा stream दिया जाए।तो इन्हे science stream मिला,इन्हे तो बस बडा बनना था तो इन्होने teachers से ही पुछा की engineer बडे होते है या doctor तो teacher ने कहा दोनो तब इन्होने general science चुना और बडा बनने का प्रयत्न शुरु कर दिया।बाद मे इनके लिए engineering के दरवाजे बंद हो गये इनका math मे result fail आया तब ये doctor बनने की तयारी मे लगे थे।जब पता चला की MBBS seats availableनही है और BDS का मिल रहा है तो इन्होने ना कर दी।और BSC की तरफ जाने के लिए सोचा तब दोस्त के बडे भाई ने बताया MBA से बडा बना जा सकता है।

जीवन का टर्निंग पॉईंट

इन्होने Bcom मे admission लिया अब वहा speech हुआ करते थे।तो इनका performance उतना अच्छा होता नही था तो इनको placement नही मिल रहा था और कंपनी इनको फ्री लेने के लिए भी तयार नही थी तब इन्होने हिम्मत नही हारी और जंग जारी रखी एक वक्त ऐसा था 150 मे से 149 student's  को placement मिला था,पर इन्हे नही।

तब इन्होने बहुत मेहनत की और सबसे पहले TVS company मे जॉब पा ली।इन्हे किसी ने कहा था की ज्यादा पाने के लिए ज्यादा मेहनत करणी पडती है तो ये वहा पर भी दो घंटे ज्यादा मेहनत करते।और जल्दी ही promotion हो गया।

मार्केटिंग की शुरुवात

कुछ दिन बाद उन्हे नेटवर्क मार्केटिंग का प्लान देखने को मिला और इन्होने उस काम को करते हुए network marketing मे कदम रखा और महारत हासिल कर ली।और अपनी जिंदगी बदल ली।और एक मिसाल बना दी।

वो शक्स कोई और नही network marketing expert, motivational speaker, business consultant दीपक बजाज है।

आप नेटवर्क मार्केटिंग कैसे शुरू कर सकते है इसके लिए आगे पढीए

YouTube channel Link-click here

सलाम है ऐसे जज्बे को और ऐसे सपने को जो इतना सफल बनाता है।

Dark web kya hai puri jankari hindi me

 डार्क वेब (Dark Web) इंटरनेट का वह हिस्सा है जिसे सामान्य सर्च इंजनों जैसे Google, Bing या Yahoo के माध्यम से एक्सेस नहीं किया जा सकता। यह ...