श्रीमद भगवत गीता
मित्रांनो श्रीमद भगवत गीता हा ग्रंथ मणुष्याला तारणारा आहे. प्रत्येक मणुष्याला याचे पठण करायला पाहिजे, कारण या प्रूथ्वीतलावरील सर्व गोष्टी चे गुढद्न्यान या ग्रंथात सांगितले आहे. असे म्हणतात की गीता वाचल्यावर प्रत्येक संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडतो. आणि हो हे अगदी खरे आहे.
खरं तर श्रीमद भगवत गीता या ग्रंथातील प्रत्येक शब्दन्शब्द महत्त्वाचा आहे. असं म्हटलं जातं कि महाभारत काळातील भीमपर्वामध्ये श्री क्रुष्णाने अर्जुनाला श्रीमद भगवत गीता सांगितली. भगवत् गीता माणसाला सात्विक जीवन कसं जगायचं?का जगायचं? हे सर्व शिकवते. भगवत् गीतेत एकुण १८ अध्याय आहेत. या प्रत्येक अध्यायांत विशेष गोष्टींंवर प्रकाश टाकला आहे. यात विशेष करुन कर्म,ध्यान, योग, द्न्यान,विद्न्यान अशा विषयावर स्वतंत्र अध्याय दिलेले आहेत. कर्मयोग सांगायचे झाल्यास कर्माचे प्रकार जसे सकाम कर्म,निष्काम कर्म ई.
भगवत् गीता गुढ रहस्यमय ग्रंथ आहे आणि ते सर्व रहस्य दैनंदिन जीवन जगत असताना फार महत्त्वाची भुमिका बजावत असतात.श्रीमद भगवत गीता हा ग्रंथ मानसिक स्थिती मजबूत ठेवण्यात महत्वाचा आहे. मानसाला काय खावं काय खाऊ नये. या सर्व विषयांवर केलेलं वर्णन आहे.
श्रीमद भगवत गीता फक्त अर्जुनाला सांगितली आहे असे नाही कारण ती संपूर्ण माणवहिताची आहे. कश्याही प्रकारच्या परिस्थितीचा किंवा संकटाचा सामना करण्यासाठी भगवत् गीता शक्ती देते. तुम्हाला कधीही निराशा व वारंवार टेन्शन येत असेल ना तर मित्रांनो एकता नीट लक्ष देऊन आणि मन लाऊन गीता वाचा किंवा youtube वगैरे वर तुम्ही ऐकू शकता. विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शक आहे.आजकाल तर श्रीमद भगवत गीता या विषयावर मोठमोठ्या युनिव्हर्सिटी सुद्धा विशेष क्लासेस घ्यायला लागल्यात.मित्रांनो आपला तर हा वारसा आहे असं म्हणायला हरकत नाही. विस्तारित माहिती हवी असेल तर मला comments करुन जरूर कळवा.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें